भगवंताचे ध्यान करा, अडचणींचे करू नका (Focus On God And Not On Problems) माणूस त्याच्या स्वत:च्या अडचणींना, शत्रुंना स्वत:च बळ देत असतो. अडचणी आणि शत्रु यांचा सतत विचार करत राहण्याने माणसाच्या अन्त:करणाचा अधिकाधिक भाग या गोष्टी व्यापत राहतात आणि त्यातून या गोष्टी त्या मानवाच्या जीवनात अधिकाधिक ताकदवान होतात. माणसाने अशा गोष्टींचा विचार करत राहण्यापेक्षा भगवंताची विश्वासाने भक्ती करणे आवश्यक आहे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या 20 नोव्हेंबर 2014 रोजीच्या मराठी प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥